May 23, 2019
Current Affairs – 23/05/2019

भारताने सोडले संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेचे सभासदत्व
जम्मू व काश्मीरसंबंधी अहवालानंतर भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेचे सभासदत्व सोडले.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेनीे (UNHRC) भारताने केलेल्या कथित उल्लंघनाबद्दल केवळ 2018सालीच 13 प्रकरणांची नोंद केली, ज्यात भारतीय सुरक्षा दलांनी चार लहान मुलांना ठार मारले.
जिनेव्हा येथील UN मानवाधिकार परिषदेनी (HRC) घेतलेेल्या या नोंदीमुळे आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेचे सभासदत्व सोडले.
भारताने संयुक्त राष्ट्रसंघाला सूचित केले आहे की या HRC च्या विशेष पत्रकारांच्या अहवालावरून यापुढे कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवला जाणार नाही.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात श्रीनगरमध्ये छळ केल्याप्रकरणी दोन स्वयंसेवी संस्थांकडून एक वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते, ज्याचे यांच्या पत्रकाराने समर्थन केले होते.
भारताने ‘काश्मीरमधील मानवाधिकारांची स्थिती’ या विषयावरील OHRCचा अहवाल देखील नाकारला. जून 2018 मध्ये जम्मू-काश्मीर संबंधित अशा प्रकारचा प्रथमच अहवाल तयार करण्यात आला होता.